आज संकष्ट चतुर्थीला गणरायाचे करा असे पूजन, तुमच्या या अडचणी होतील दूर

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे,अत्यंत ते साजिरे,माथा शेंदूर पाझरे वरीवरे,दूर्वा़ंकुराचे तुरे,माझे चित्त विरे मनोरथ पुरे,देखोनी चिंता हरे, गोसावीसूत वासुदेव कवी रे,त्या मोरयाला स्मरे, अशा गणेशाला स्मरून आपण आपल्या अडचणी दूर करू शकतो. आज संकष्टीला या उपायांनी गणेशाला प्रसन्न करू शकतो. तर जाणून घ्या हे उपाय कोणते…
गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणपती बाप्पाच्या आगमानापूर्वीची म्हणजेच श्रावण महिन्यातील संकष्टी आहे. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे,अत्यंत ते साजिरे,माथा शेंदूर पाझरे वरीवरे,दूर्वा़ंकुराचे तुरे,माझे चित्त विरे मनोरथ पुरे,देखोनी चिंता हरे, गोसावीसूत वासुदेव कवी रे,त्या मोरयाला स्मरे, अशा गणेशाला स्मरून आपण आपल्या अडचणी दूर करू शकतो. आज संकष्टीला या उपायांनी गणेशाला प्रसन्न करू शकतो. तर जाणून घ्या हे उपाय कोणते…
आर्थिक आणि करियर- संकष्ट चतुर्थीला गणेश पूजन केल्याने पाप ग्रह केतू आणि बुध ग्रह यांचा अशुभ प्रभाव दूर होतो. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला व्यवसाय,व्यापार,लिखाण,बुद्धीचा कारक म्हटले गेले आहे आणि केतू मोक्षाचा कारक आहे. या ग्रहांच्या अशुभ प्रभावाने धन संपत्ती व्यापार करियर शिक्षण इत्यादी क्षेत्रात अडचणी येतात. परंतु आज संकष्टीला गणेशाच्या पूजनाचा लाभ मिळेल आणि या सर्व क्षेत्रातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल.
यशप्राप्तीसाठी– काही परीक्षा या जीवनाला आणि करिअरला कलाटणी देणाऱ्या असतात. अशा परीक्षांमध्ये अपयश आले, तर विद्यार्थी खचून जातो. मेहनत, परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षांमध्ये यश मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे गणपती आपली नक्की मदत करू शकतो. प्रामाणिकपणे गणपतीचे नामस्मरण करावे. याशिवाय गणेश मंदिरात जाऊन कच्च्या धाग्याला सात गाठी माराव्यात. ‘जय गणेश काटो क्लेश’ किंवा ‘गणपती बाप्पा विघ्न दूर करा’ अशी प्रार्थना करून तो धागा गणपतीसमोर ठेवावा. यानंतर तो धागा आपल्याजवळ ठेवावा. असे केल्याने विघ्न दूर होऊन यशप्राप्ती सुरू होते, अशी मान्यता आहे.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी– माणूस अनेकदा अनेक गोष्टी विसरत असतो. स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार, अशावेळी गणपतीला शरण जावे. मनापासून गणपतीची आराधना, उपासना, नामस्मरण करावे. प्रत्येक गुरुवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण करावे. संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणता येत नसल्यास, ‘महाविघ्नात्प्रमुच्यते।। महादोषात्प्रमुच्यते।। महापापात् प्रमुच्यते। स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति। य एवं वेद इत्युपनिषद’ या शेवटच्या श्लोकाचे पठण करावे. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
कौटुंबिक अडचणीसाठी- पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती, तेव्हा गणपतीने महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता. आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले होते. गणपतीला स्मरून आपणही आपल्या आई वडिलांना न चुकता रोज नमस्कार करावा यामुळे कौटुंबिक कलह दूर होतील, कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल, अशी मान्यता आहे. आई-वडील नसल्यास घरातील ज्येष्ठ मंडळींना न चुकता नमस्कार करावा, असे सांगितले जाते.
रागावर मिळवा नियंत्रण- काही जण एकदम शीघ्रकोपी असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेकांना राग येत असतो. बहुतांश जणांना त्यानंतर पश्चात्ताप होतो. मात्र, नंतर पश्चात्ताप होऊन काहीही उपयोग नसतो. अनेक जण रागावर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु, त्यांना यश मिळत नाही. काही केल्या राग उफाळून येतो. मन अशांत असते. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक प्रयत्न करूनही क्रोध शांत होत नसेल, तर गणपतीसमोर नतमस्तक व्हावे. गणपतीला दररोज लाल फूल अर्पण करावे. गणपतीचे नामस्मरण करावे. असे केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते, अशी मान्यता आहे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.