कधीकाळी माधुरी दीक्षितचा या क्रिकेटवर जडला होता जीव.. मात्र, या कारणामुळे तुटले संबंध..

नव्वदच्या दशकामध्ये अनेक अभिनेत्री धडपडत असताना एक मराठमोळा चेहरा आश्वासक वाटत होता. तिचे नाव होते माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित हिने त्या काळात प्रचंड हिट चित्रपट केले. कधी कुठली अभिनेत्री बोल्ड सीन चा विचार ही करत नव्हती. त्यावेळी माधुरी दीक्षित हिने विनोद खन्ना सारख्या ज्येष्ठ अभिनेतासोबत दयावान या चित्रपटांमध्ये अतिशय बोल्ड सीन देत सर्वांना चकित केले होते. यानंतर या सीनची चर्चा खूप झाली होती.
काही वर्षांनंतर माधुरी दीक्षित हिने देखील आपल्याला असा केल्यामुळे पश्चाताप झाल्याचे म्हटले होते. माधुरी दीक्षितच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. यामध्ये तेजाब सारखा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये प्रचंड नाव केले होते. त्यानंतर सूरज बडजात्या यांचा हम आपके है कौन हा चित्रपट प्रचंड राहिला होता.
या चित्रपटात सलमान खान असूनही माधुरी दीक्षित-नेने हिने अधिक भाव खाल्ला होता. हा चित्रपट खऱ्या अर्थाने नायिकाप्रधान असल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. या चित्रपटाने पन्नास आठवडे बॉक्स ऑफिस वर कम्प्लीट करून अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. त्यानंतर माधुरी दीक्षित हिने यश चोप्रा यांच्या सोबतही काम केले.
दिल तो पागल है, हा चित्रपट तिचा प्रचंड चालला. यासह तिने शाहरुख खानसोबत देखील काम केले. सगळ्या खान लोकांसोबत तिने काम केले. आमिर खान सोबत तिने दिल चित्रपट केला होता. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. माधुरी दीक्षित हिने काही वर्षांपूर्वी डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर हे जोडपे अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना दोन अपत्ये देखील आहेत.
मात्र, काही वर्षांपूर्वी माधुरी दीक्षित ही भारतामध्ये स्थायिक झालेली आहे. तिचे पती देतील भारतातच प्रॅक्टीस करत असल्याचे सांगण्यात येते. माधुरी दीक्षित आता आपल्या वयानुसार भूमिका साकारताना दिसत आहे. आम्ही आपल्या माधुरी दीक्षितच्या आयुष्यातील एका महत्वाच्या घटनेबाबत आज माहिती सांगणार आहोत. माधुरी दीक्षितचे नाव तसे अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले.
मात्र, त्याबाबत कधी जास्त चर्चा झाली नाही. माधुरी दीक्षित चे नाव संजय दत्त याच्यासोबत देखील जोडले गेले. ती संजय दत्त सोबत लग्न देखील करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचे नाव आले आणि माधुरी दीक्षितने त्याच्यापासून दुरावा केला होता. असेच माधुरी दीक्षितचे नाव एका क्रिकेटच्या सोबत जोडले गेले.
तो क्रिकेट टर आपल्या तुफान बॅटिंगने परिचित होता. त्याचे नाव अजय जडेजा. तो सर्व परिचित होता. मात्र, अजय जडेजा त्याच्या कुटुंबीयांना हे नाते मात्र मान्य नव्हते. त्याच वेळी मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन याच्यासोबत अजय जडेजा याचे नाव देखील जोडल्या जात होते. त्यामुळे अजय जडेजा ची कारकीर्द हीसंपुष्टात आली होती. या वेळी माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांचे नाते भारत होते.
अजय जडेजा चे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आल्यामुळे माधुरी दीक्षितने त्याच्या पासूनही दुरावा केला होता. याबाबत त्यावेळी खूप चर्चा रंगली होती.